। मुंबई । वृत्तसंस्था ।
राजकीय वर्तुळात कालपासून केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले ११ लाख पैकी अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केली आहेत. अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. यावर आता निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
ठाकरे गटाची शपथपत्र बाद करण्याचा अद्याप कोणताही निर्णय नाही, असे निवडणुक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच, सध्या ठाकरे गटाची शपथपत्र निवडणुक आयोगाला मिळाली आहेत. सध्या शपथपत्र तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार, याबाबत लोकांमध्ये नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. असा आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.