। उरण । वार्ताहर ।
अरबी समुद्रात वाहणार्या वार्यामुळे एम.व्ही.श्रीकांत मुंबई या नावाची बाज भरकटली. ती केगाव दांडा किनार्यावर धडकली आहे.याशिवाय वार्यामुळे केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दशक्रिया विधी करण्यात येत असलेल्या इमारतीवरील सिमेंटचे पत्रे वार्याच्या वेगात उडून गेले आहेत. उरण तालुक्यातील किनार्यावर मागील दोन दिवसांपासून वार्याचा वेग वाढला आहे.