गावांना बसणार पुराचा फटका, गाळ काढण्याची मागणी
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिर्ले, वेश्वी, पागोटे, भेंडखळ परिसरातील पाणी निचरा होणाऱ्या खाड्या या वर्षनुवर्षे गाळ आणि कचरा येऊन गाळात रुतल्या आहेत. त्यामुळे सदर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पुराचा तडाखा यावर्षी बसणार आहे. तरी शासनाने खाडी पात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाचे पाणी हे नाल्यावाटे खाडीपात्रात वाहत येऊन मिळत आहे. या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ कचराही वाहून जात आहे. वर्षानुवर्ष वाहून गेलेल्या गाळाने आणि कचऱ्याने भरून गेले आहे. त्यात खाडी पात्रात खारफुटी आणि झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा हा लवकर होताना दिसत नाही. तसेच खाडी किनाऱ्यावर वाढती अतिक्रमणे यामुळे पावसाळ्यात गाव परिसरात पूरस्थिती निर्माण होत आहे. यावर्षी खाडी पात्रातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतले नाही. तर यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे.
गाळाने जर खाडी पात्र भरले असेल तर कोणत्या योजनेतून ते करता येईल का हे पाहून त्यावर उपाय योजना केली जाईल.
उद्धव कदम
उरण तहसीलदार