युवकांच्या प्रसंगावधाने ज्येष्ठाचे वाचले प्राण

| पाताळगंगा | वार्ताहर |

आंबिवली, ता.खालापूर येथे विजेचा शॉक लागलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला युवकांच्या प्रसंगावधाने जीवनदान मिळाले. विजेच्या खांबाच्या बाजुला एक वयोवृद्ध काम करीत होते. मात्र हेच काम आपल्या जिवावर बेतू शकते यांची कल्पना नव्हती, मात्र काही क्षणांत ओरडू लागले. तेथे उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांनी प्रसंगावधान राखत काठीने त्या नागरिकाचे प्राण वाचविले. यावेळी रमेश जाधव, रुपेश जाधव, सतिश जाधव, सुरेश शेरे, संतोष कांबळे, वैभव परांगे,अनिल जाधव,नामदेव जाधव, अरुण ल.जाधव,दिक्षा जाधव आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version