क्रांतीवीरांगणा हौसाक्कांची उणिव शेकापला भासेल

आम.जयंत पाटील यांची; भावपूर्ण आदरांजली
विटा | प्रतिनिधी |
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा हौसाक्कांनी आयुष्यभर जपला.त्यांनी आयुष्यच्या अखेर समाजातील ज्वलंत प्रश्‍नांवर लोकलढे उभे केले. त्यांची उणिव शेकापला सतत जाणवत राहिल. असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथील क्रांतीवीरांगणा हौसाक्का पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यात शेकापच्या वतीने स्वातंत्र्यत्तोर कालखंडात हौसाक्कांनी दुष्काळी निर्मुलनासाठी विविध आंदोलने केली. दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्याचे काम केले. दरम्यान, सागरेश्‍वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी सांत्वन केले. यावेळी अ‍ॅड.अजित सूर्यवंशी,संपतराव पवार, देवकुमार दुपटे, अ‍ॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रा. विलासराव पाटील, रणजीत पाटील,इंद्रजीत पाटील उपस्थित होते.

Exit mobile version