। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी आणि अन्य परिसरात गेल्या पाच दिवसांपासून वादळी वार्यासह तुरळकपणे कोसळणार्या पावसामुळे परिसरातील मोबाईलचे नेटवर्कही गायब झालेली आहे. येथील पंचक्रोशिमध्ये काहींचे वादळी वार्यामुळे नुकसान झाले होते. याबाबत मुंबई तसेच अन्य शहरात नोकरी निमित्त गेलेले गावाकडे फोन करून चौकशी करत असतात. परंतु, मोबाईलवरील बोलणे काही समजत नसल्यामुळे तेथील नातेवाईक चिंतेत आहेत. तसेच, या परिसरात लाईट वारंवार खंडित होत असल्यामुळे प्रचंड उष्म्याशी अनेकांना सामना करावा लागत आहे. मात्र, येथील वायरमन रात्रंदिवस मेहनत घेऊन खंडित झालेली लाईट पुन्हा पूर्ववत करत आहेत.