। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड हे पर्यटनाचे क्षेत्र असल्याने याठिकाणी शनिवार-रविवार शेकडो पर्यटक ये-जा करत असतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पर्यटक समुद्र किनारी न फिरकल्याने सर्वत्र शांततेचे वातावरण आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्या तरी मुरूड समुद्रावर पर्यटकांची वर्दळ नसल्याने सर्व हॉटेल व लॉजिंग व्यवसाय, टपरीधारक, घोडेस्वार, घोडागाडी व बाईकस्वार रिकामे बसून आहेत. संपूर्ण व्यवसाय ठप्प झालेले आहेत. याबाबत मनोहर बैले याना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मुरुड समुद्रकिनारी पर्यटक अल्पप्रमाणात येत आसल्याने स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होत आहे. मागील महिन्यात मुलांच्या परिक्षा असल्याने पर्यटक कमी येत होते. आता मुलांच्या परिक्षा संपल्या नंतर शनिवार-रविवार मोठी पर्यटकांची गर्दी होईल अशी अपेक्षा होती. परंतु हा शनिवार व रविवार कोरडा गेला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.