। श्रीवर्धन । वार्ताहर ।
परतीचा पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने शेतामध्ये असलेल्या भाज्या कुसून गेल्या आहेत. परिणामी भाज्यांची आवक कमी झाली आहे. भाज्यांची आवक कमी होत असल्यामुळे भाज्यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर कडाडलेले पाहायला मिळत आहेत. भाज्यांचे भाव कडाडले असल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. श्रीवर्धन तालुक्यात आता पावसाळा संपत आल्याने स्थानिक पिकणार्या भाज्या देखील बाजारात येत नसल्याने गृहिणींना भाजीच्या दुकानातूनच भाजी खरेदी करावी लागत आहे. परंतु भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट मात्र कोलमडलेले पाहायला मिळत आहे. भाज्यांचे भाव वाढल्यामुळे भाजीविक्रीमध्ये देखील मंदी आल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.