चाळीशीपार क्रिकेट हंगामाला सुरुवात

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

। कर्जत । प्रतिनिधी ।

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी (दि.12) कर्जत 40 पेक्षा अधिक वयोगटातील खेळाडूंच्या क्रिकेट हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या नवीन हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य मधुकर सुर्वे, रणजित जैन, शिरीष दिघे यांच्या हस्ते करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे एक सामाजिक संकल्पना घेऊन 40 पेक्षा अधिक वयोगटातील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याप्रमाणे नवीन हंगामात सुद्धा ‘व्यसनमुक्ती 40 प्लस’ चषक या नावाने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे कर्जत 40 प्लस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शशांक शेट्टी यांनी जाहीर केले आहे.

यावेळी कर्जत क्रिकेट परिवारातील गजेंद्र दांडेकर, विनायक परांजपे, प्रविण गांगल, सचिन मनोरे, सुनील खातु, राजु ओसवाल, विराग फाटक, प्रकाश गायकवाड, सुरेश मोहिते, पांडुरंग मोहिते, पांडुरंग पाटील, भाई जाधव, बाळा धनवे, तुषार जोशी, दिपंकार सालये, गिरीश सुर्वे, किरण देशमुख, दिनेश कडु, समीर चव्हाण, जयवंत पिंगळे, संदीप देशमुख, मंगेश म्हसे, विशाल निमकर्डे, सुरेश गायकवाड, सुरेश ठाकरे, सुजित जाधव, चंद्रकांत दगडे, सुभाष पाटील, बाळा पाटील, पराग कोकजे, जितेंद्र देशमुख, जगदीश पालकर, ध्रुव खातु, भव्य आणि दिव्य सुर्वे उपस्थित होते.

Exit mobile version