आदई, नेवाळी गावचा पाणीप्रश्‍न सुटणार

। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेलला लागूनच असलेल्या आदई गावामध्ये नागरीकरण झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे नागरीसुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे आदई व नेवाळी या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. भविष्यात होणारी बांधकामे आणि त्यामुळे पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होणार ही गोष्ट सरपंच रमाकांत गरुडे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जलजीवन मिशन अंतर्गत आदई नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 5.23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच आदई व नेवाळी गावचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे.

Exit mobile version