। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सुगवे गावातील 22 वर्षीय तरुण कर्जत-मुरबाड राष्टीय महामार्ग रस्त्याने घरी परतत असताना मुरबाड कडून अतिवेगाने आलेल्या कंटेनरने अक्षरश चिरडले.या अपघातात सुगवे येथील तरुणाचा मृत्यू झाला असून त्या तरुणाच्या शव वच्छेदन करण्यासाठी किमान चार तास स्थानिकांना कशेळे ग्रामीण रुग्णालयात ताटकळत राहावे लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
वैभव संभाजी ऐनकर हा सावळे गावातून आपली दुचाकी एमएच 46-ए क्यू 0237 यावरून घरी येण्यास निघाले होते. वाकडी पूल येथे आले असता समोरून मुरबाड कडून आलेल्या कंटेनरने (एमएच 46-बीबी 0959) चरडले. त्यावेळी ते कंटेनर एका ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करून त्या तरुणाच्या अंगावर आले. त्या तरुणाला अपघातग्रस्त केल्यानंतर ट्रकचा चालक अक्षयकुमार हरिलाल मोर्या हा तेथे आपले व्हॅन थांबवून जखमीची विचारपूस न करता तेथून पळ काढून कर्जतच्या दिशेने जात होता. तर अपघातग्रस्त तरुण हा अपघात दुपारी तीन वाजता झाला त्यावेळी जिवंत अवस्थेत हात पायाला गंभीर जखमा होऊन देखील मदतीच्या मागणी साठी विव्हळत होता. तब्बल अर्ध्या तासाने त्या तरुणाला स्थानिकांनी कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं,मात्र तेथे प्राथमिक उपचार घेता असताना या तरुणाचे निधन झाले.
कर्जत जवळ तो कंटेनर अडकून पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले,मात्र कशेळे ग्रामीण रुग्णालयात चार ते सात या तीन तासांच्या कालावधीत वैभव संभाजी ऐनकर या तरुणाच्या शवाचे विच्छेदन कार्याला कोणताही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हता.त्यात किमान दीड हजार लोकांची गर्दी कशेळे ग्रामीण रुग्णालयात जमाव संतप्त होऊ लागल्याने पोलिसांनी कर्जत येथून शव विच्छेदन करणारे डॉक्टर बोलावून घेतले आणिरात्री नऊ वाजता मृतदेह वैभवच्या नातेवाईक यांच्या हाती सुपूर्द केला. या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मोटार वाहन अधिनियम कलम 84/134,तसेच 330,221,304 (अ),338,279 347 असे कलम कंटेनर चालक अक्षय मोर्या यांच्यावर लावण्यात आले आहेत.