। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जनआधीर्वाद यात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असूनही चोरीची घटना घडली आहे.गर्दीचा फायदा घेत चोरीची चार जणांच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळ्या अज्ञाताने लांबवल्या आहेत. याबाबत नगरसेवक सुशांत चवंडे यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.