• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राज्यात परीवर्तन होणार- सरचिटणीस जयंत पाटील

Krushival by Krushival
August 3, 2024
in sliderhome, अलिबाग, पंढरपूर, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात परीवर्तन होणार-  सरचिटणीस जयंत पाटील
0
SHARES
318
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| प्रमोद जाधव | स्व. गणपतराव देशमुख नगरी, पंढरपूर |

शेतकरी कामगार पक्ष आता नव्या जोमाने काम करणार आहे. पक्षाने 70 टक्के तरुणांना चिटणीस मंडळात सहभागी करुन घेतले आहे. नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. भविष्यात राज्यात परिवर्तन होणार, हे नक्की. येणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा असेल. येणार्‍या काळात आमूलाग्र बदल घडेल, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. पंढरपूर येथे अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी समारोप भाषणात ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरिबांशी बांधिलकी जपली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचवा, अशी भावनिक साद घालून जनतेशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

यावेळी माजी आ. संपतबापू पवार पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, प्राध्यापक एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापचे नेते सुरेश खैरे, प्रीतम म्हात्रे, रायगड बाजार चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, अनिल चोपडा, वैशाली पाटील, प्रिया वेलणकर, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, अ‍ॅड. गौतम पाटील, देवा पाटील, प्रदीप नाईक तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा चिटणीस, तालुका चिटणीस, शेकापच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी उपस्थित होते.

आज शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप ज्येष्ठ नेते संपत बापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचा आनंद आहे. एक जाणकार अनुभवी नेता या अधिवेशनाला मार्गदर्शक म्हणून मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. जनशक्तीच समाजाचे परिवर्तन करू शकते, हे आजच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भविष्यात देशांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने परिवर्तन होणार आहे. केंद्रातील सत्तेत डाव्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून, महाराष्ट्रातदेखील डाव्या विचारांचा मुख्यमंत्री असणार आहे, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकरी कामगार पक्षाच्या संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. बदलत्या काळानुसार शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. शेकाप कात टाकणार आहे. 70 टक्के युवकांना संघटनेत संधी दिली आहे. पक्षात काम न करणार्‍यांना काढण्यात आले असून, प्रत्यक्ष काम करणार्‍यांना यावेळी संधी दिली. 2029 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत बदल होणार आहे. खासदारांची संख्या कमी आमदारांची संख्या वाढणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. त्याची तयारी कार्यकर्त्यांनी आतापासून सुरुवात करायला पाहिजे. विधानसभेत शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत राहणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मोठे ताकदीने काम करायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरिबांशी बांधिलकी जपली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचवा, अशी भावनिक साद घालून जनतेशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
सध्याची राजकीय परिस्थिती बिकट आहे. गोरगरिबांवर वेगवेगळे कर लादून त्यांना वेठीस धरण्याचे काम हे सरकार करत आहे. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. या शेतकर्‍यांच्या खतावरदेखील टॅक्स लावून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव आहे. हे सरकार शेतकर्‍यांचे कैवारी नाही, याची जाणीव करून दिली पाहिजे. देशामध्ये जातीनिहाय गणना झाली पाहिजे.

आरएसएसची विचारसरणी असलेला भाजपा पौराणिक काळापासून गोरगरिबांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आला आहे. सर्वसामान्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्याची पुनरावृत्ती सध्या सुरू आहे. कुटुंबियांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचा या सरकारला विसर पडला आहे. देशामध्ये नीतीमत्ता राहिली नसून, संविधानदेखील धोक्यात येऊ लागले आहे.

देवेंद्र फडणवीससारखे गृहमंत्री असतानादेखील राज्यात अराजकता माजली जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे. सरकारचे गुंडगिरी करणार्‍यांवर नियंत्रण राहिले नाही. नागरी सुरक्षेबरोबर महिला सुरक्षेचा प्रश्‍नदेखील गंभीर होऊ लागलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचे वाटोळे या सरकारने केले असून, महाराष्ट्राचे नाव खराब करून टाकले आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळली असून, गुंड भरदिवसा कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. देशासह राज्यात बहुजनांची सत्ता आली पाहिजे, शेती साधनांवरील असलेली जीएसटी अन्यायकारक असून, ती रद्द केली पाहिजे. या सरकारचे शेतीविरोधी धोरण आहे. या अंधाराला भेदून उद्याची पहाट ही आपलीच असणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

शेकापमध्ये खरं वैभव!
गेल्या काळात अनेकजण पक्ष सोडून गेले. मात्र, खचून न जाता नव्या उमेदीने काम करायचे आहे. मी 70 व्या वर्षात पदार्पण केले असले तरी चाळीशीत असल्यासारखं काम करणार आहे. टिंगल करणार्‍यांना आपण पक्षाची ताकद दाखवून देऊ. शेकापचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत. नव्या पिढीवर जबाबदारी दिली आहे. मात्र, पक्षासोबत गद्दारी करु नका. दुसर्‍या पक्षात नव्या नवरीसारखं दोन दिवस मान मिळेल. मात्र, शेकापमध्ये खरं वैभव आहे. इथे कार्यकर्त्यांना सन्मान आहे. आपल्याच लोकांनी गद्दारी केली म्हणून आपला पराभव झाला. मात्र, खचून जाऊ नका. उद्याची पहाट ही आपलीच आहे. शेकापला संघर्षमय इतिहास आहे. तो कुणीही पुसून टाकू शकत नाही, असे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspandharpur newspoliticalpoliticals newraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

ऑलिंपिकमध्ये भारतीयांची ‘चाल’ बिघडली

Next Post

खोपोलीत रक्तदान शिबीर संपन्न

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
sliderhome

पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार

July 31, 2026
पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन
अलिबाग

पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन

July 31, 2026
Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला
sliderhome

Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला

July 31, 2026
रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?
sliderhome

रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?

July 31, 2026
Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा
sliderhome

Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा

July 31, 2026
Next Post
पोयनाड लायन्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर

खोपोलीत रक्तदान शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?