इंग्लंड | वृत्तसंस्था |
भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मागील काही काळात मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. इंग्लंडविरुद्ध तिसर्या कसोटीच्या दुसर्या डावात चेतेश्वर पुजाराने 91 धावांची खेळी केली. त्याला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिली. त्यातच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही सातत्याने धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी अतिरिक्त फलंदाजाची संघात निवड करण्याची गरज असून, मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी देण्याची हीच वेळ असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे.