धबधब्यांवर जाण्यास पर्यटकाना बंदी


। राजापूर । वृत्तसंस्था ।
तालुक्यात दमदार झालेल्या मान्सुनच्या आगमनामुळे तालुक्यातील पावसाळी पर्यटनाचे आकर्षण असलेले धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र कोरोना विषाणु संसर्गामुळे या धबधब्यांवर जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने पर्यटन प्रेमींचा हिरमोड झाला आहे.

राजापूर तालुका हा निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. पावसाळयात तर हे सौंदर्य अधिकच बहरून येते. पावसाळा सुरू होताच तालुक्यात विविध ठिकाणी डोंगर कडयातून ओसंडून वाहणारे धबधबे हे पावसाळी पर्यटनासाठी सज्ज होत असतात. चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा, धोपेश्‍वर येथील श्री धुतपापेश्‍वर मंदिर परिसरातील कोटीतिर्थ धबधबा, सौंदळ, ओझर, काजिर्डा, हर्डी येथील धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत.तर वर्षी या ठिकाणी हौशी पर्यटकांची गर्दी होत असते.डोंगरकपारीतून खळाळून वाहणारे हे धबेधबे पर्यटकांना साद घालू लागले आहेत. मुळातच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजापूर तालुक्याला या धबधब्यांनी अधिकची भर घातली असून हे धबधबे लक्ष वेधुन घेत आहेत. मात्र यावर्षी कोरोना विषाणु संसर्गाचा असलेला धोका लक्षात घेवून या धबधब्यांवर प्रवेशासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

Exit mobile version