सिद्धेश्‍वर ग्रामस्थांची एकजूट

श्रमदानातून बांधले दोन वनराई बंधारे
| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर बुद्रुक गावातील व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य एकत्र येऊन गावचा पाणीप्रश्‍न सुटावा यासाठी एकत्र आले आहेत. स्वयंप्रेरणेने सर्वजण एकजूट होऊन श्रमदान करून नुकतेच दोन वनराई बंधारे बांधले आहेत. सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ व शंकर मंदिराजवळील ओढ्यावर हे बंधारे बांधण्यात आले आहेत. हाती कोयता, कुदळ, फावडे आदी सामुग्री घेऊन वृद्ध व महिलादेखील खांद्याला खांदा लावून काम करु लागल्या. या सगळ्यांसोबत आदिवासी बांधवदेखील प्रचंड ऊर्जा घेऊन उतरले आणि हे दोन बंधारे बांधले.

यामुळे येथील भूजल पातळी वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहीर, तलाव, कूपनलिकांना मुबलक पाणी राहील. वापरासाठीदेखील पाणी मिळेल, शिवाय पशुपक्ष्यांनादेखील पाणी उपलब्ध होणार आहे. या श्रमदान मोहिमेत सरपंच आशिका पवार, उपसरपंच किंजावडे, सदस्य समृद्धी यादव, संजना फाळे, सुरेश पवार, सर्व सदस्य, ग्रामसेवक ए.टी. गोरड. तंटामुक्त अध्यक्ष बबन वाघमारे, गणेश महाले, सचिन मुंढे, रसिका वरघडे यांनी मोलाचे सहकार्य केल्याने हे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

Exit mobile version