| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक म्हणून 33 वर्षे सेवा करणार्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वासंती काटले – घोंगे नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. गोंधळपाडा येथील प्राथमिक शाळेत त्यांचा निरोप समारंभ वेश्वीचे उपसरपंच नंदकुमार कदम यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे, समिधा गुरव, माजी उपसरपंच नरेश पडियार, सुनिल गुरव, दिलीप सूद, एकनाथ गोतावडे, नितीन गोतावडे, पोलीस पाटील भारती नमसोले, प्रसाद गोतावडे, राजेंद्र नमसोले, मुख्याध्यापिका रसिका नाईक, पदवीधर शिक्षिका प्राची ठाकुर, दिपक पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, गोंधळपाडा ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूण 33 वर्षे शिक्षक म्हणून सेवा त्यांनी केली असून वयोमनानुसार त्या सेवानिवृत्त झाल्या. शाळेच्या सभागृहात निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानित करून त्यांच्या पुढील वाटचालीस मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. वासंती काटले यांना जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार सारखे अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.