| उरण | वार्ताहर |
वेश्वी, ता.उरण येथील एकवीरा डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यात यश आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आगीतून वाचली आहे. डोंगर माथ्यावर काही वर्षा पूर्वी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे पाचशे बांबूची लागवड करण्यात आली होती. त्याच बांबूच्या लागवडीला आग लावण्यात आली.
आगीच रौद्ररूप पाहता त्या हिरव्यागार बांबूची जळून राखरांगोळी होतो की काय असं वाटत असतानाच ही गोष्ट संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या निदर्शनास येताच लगेचच त्यांनी आपल्या टीमला कळवले. लागलीच कॉन संस्थेच्या सदस्यांनी तिथे धाव घेऊन मागचा पुढचा विचार न करता तो जंगलाला लागलेला वणवा विझविण्यात यश मिळविले.