नारळफोडी स्पर्धेत विलास धाटावकर प्रथम

| रेवदंडा | वार्ताहर |

नारळी पौर्णिमेनिमित्त पंचवीस वर्षांची परंपरा जपलेल्या रेवदंड्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुहास घोणे आयोजित रेवदंडा-चौल ग्रामस्थ मंडळाच्या नारळ फोडी स्पर्धेत रेवदंडा येथील विलास धाटावकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक निखिल वारगे-स्वप्निल केळसकर-दिवेआगर, तृतीय केदार मळेकर-चौल, चतुर्थ प्रथमेश बनिया-रेवदंडा यांनी पटकाविले, तर शिस्तबद्ध संघ साई स्पोर्टस्‌‍-रेवदंडा, जास्त नारळ फोड्या संघ विलास धाटावकर-रेवदंडा, उत्कृष्ट मारेकरी-तुषार धाटावकर-रेवदंडा, नवोदित मारेकरी-प्रसाद पाटील-चौल यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेला सुहास घोणे व अध्यक्ष संदेश बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकांळी चार वाजता प्रारंभ झाला. या स्पर्धेचा मैदान क्रमांक एकचा शुभारंभ शरद गोंधळी यांच्या हस्ते, तर मैदान क्रमांक दोनचा शुभारंभ शिंदे गट शिवसेना अलिबाग तालुका संघटक प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिंदे गट शिवसेना अलिबाग तालुका संघटक प्रफुल्ल मोरे, माजी ग्रा.पं. सदस्य संदीप खोत, चौल ग्रा.पं. उपसरपंच अजित गुरव, शेकापक्ष शहर अध्यक्ष सलिम गोंडेकर, असिफ गोंडेकर, रमेश वार्डे, सुभाष शेळके, राजेंद्र नाईक, भारत वाडेकर, मंगेश मढवी, प्रमोद म्हात्रे, दिपेश पाटील, राहूल हेमंत गणपत, सिध्देश मळेकर, मुनाफ गोंडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 11 हजार 111 रूपये व कै. संजय म्हात्रे स्मृतीचषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णू आचरेकर चषक, द्वितीय क्रमांकास 6 हजार 666 रूपये व कै. लक्ष्मीबाई घोणे यांच्या स्मरणार्थ चषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णु आचरेकर स्मृतीचषक, तृतीय क्रमांकास 3 हजार 333 रूपये व कै. कल्पना मधुकर नाईक यांचे स्मरणार्थ स्मृतीचषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णू आचरेकर स्मृतीचषक, चतुर्थ क्रमांकास 3 हजार 333 रूपये व समर्थ कृपा ट्रेडर्स चौल चषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णू आचरेकर स्मृतीचषक तसेच अलिशेठ गेोंडेकर यांचे स्मरणार्थ शिस्तबद्ध चषक, दक्ष पाटील पुरस्कृत उत्कृष्ट मारेकरी चषक, दक्ष पाटील पुरस्कृत नवोदित मारेकरी चषक उत्कृष्ट नारळ अनमोल मोबाईल पुरस्कृत स्मार्ट वॉच अशी बक्षिसे मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आली.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन सुहास घोणे यांनी केले, तसेच स्पर्धेत गुणलेखनाचे काम बंटी शेळके व मंगेश मढवी यांनी पाहिले, नारळ तपासणी यांनी केली. तर पंचाचे काम अजित पाटील, अरूण घरत, जयवंत पाटील व चंद्रकांत धाटावकर यांनी पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुहास घोणे व दिपेश पाटील मित्रर्मंडळ रेवदंडा-चौल ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version