। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्या संबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी हा नियम लागू असेल. त्यासाठी संबंधित ठिकाणी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार दि.18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. या निवडणुकीसाठी दि.24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत अर्ज दाखल करण्याचा कालावधी असेल. या दरम्यान शासकीय सुट्टीमुळे 27, 28 आणि 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.