प्रकल्प गेला म्हणून बिघडले कुठे; राज ठाकरेंचा सवाल

| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत असून राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 18व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरं दिलं.यावरुन आता राष्ट्रवादीने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या या विधानावर आक्षेप घेत प्रकल्प जाणेच चुकीचे आहे,असे म्हटले आहे.

जे आहे ते टिकवा
महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टीकवलं तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

प्रकल्प जाणेच चुकीचे
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यातून बेरोजगारी, बेकारी प्रचंड वाढत आहे. असे असताना मग मुलांनी काम कुठं मागायचं. लाखो कोटी रुपयांचं प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील. – अजित पवार,विरोधी पक्षनेते

Exit mobile version