। जालना । प्रतिनिधी ।
जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका 24 वर्षीय तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 12) घडली. विठ्ठल गंगाधर कावळे असे मयत शेतकर्याचे नाव आहे. भाटेपुरी येथील शेतकरी विठ्ठल कावळे हा शेतात मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी गेला होता. मात्र, अचानक दोन वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटांसह वादळी वारा आणि पाऊस सुरु झाला. त्याचवेळी अंगावर वीज कोसळली. गावकर्यांनी त्याला तात्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याची माहिती कळताच मृतदेह प्रशासनाने शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.