नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या मंथनाचा आज समारोप झाला. कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोलमडलेली व्यवस्था त्यावरून मोदी सरकारच्या प्रतिमेबाबत होणारी चर्चा, पश्चिम बंगालमध्ये जोर लावूनही भाजपचा पराभव आणि नंतर तिथे उद्भवलेली राजकीय हिंसा. पुढच्या काही महिन्यात होणार्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका, योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशैली बद्दल पक्षांतर्गत तक्रारी या सगळ्या बाबतीत या बैठकीत मंथन करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून संघाचे दहा वरिष्ठ पदाधिकारी दिल्लीत चिंतन करत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व पाच सहसरकार्यवाह, भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बीएल संतोष यांच्यासह संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीत भाग घेतला आहे.