। पुणे । प्रतिनिधी ।
यंदाच्या वर्षी मान्सूनचं आगमन काही काळ उशिराने झालं असलं तरी राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे मोठं नुकसानही झालं. यंदाच्या पावसामुळे राज्यात पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध आहे. आता या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हवामान विभागाने याविषयीचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या 24 तासांमध्ये या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून सुरुवात होत आहे.