खंडीभर पीक जळून खाक
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अतिवृष्टी त्यातचवेळी पडत असलेल्या पावसाने रायगडातील शेतकरी हा चिंतेत होता. यातच अलिबाग तालुक्यातील नेहुली गावातील शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने हाता तोंडाशी आलेले खंडीभर पीक जळून खाक झाले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात शेतकर्यांनी तक्रार दाखल केला आहे.
मात्र, ही आग नक्की कशाने लागली याचे कारण अद्याप आजून देखील कळले नाही. याबाबत आता प्रशासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली गावातील शेतकर्यांनी आपल्या शेतात भात पीक घेतले होते. उत्तम पडलेल्या पावसाने भात पीक चांगले बहरले होते. भात पीक तयार झाल्यानंतर कापणी करून, शेतातच पीक पसरून ठेवले होते.
दुपारच्या सुमारास भात पिकाला आग लागल्याचे पाटील यांच्या कुटूंबाने शेताकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना अपयश आले. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर जळून गेल्याने शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. याबाबत त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने याबाबत आता लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आग नक्की कशाने लागली याचे कारण कळले नाही.