| अलिबाग | प्रतिनिधी |
रेवदंड्यातील हजरत पीर शेहेनशा वली यांच्या पवित्र दर्ग्यात बुधवारी (दि. 5) पारंपरिक उरूस उत्सव भक्ती, आनंद आणि सौहार्दाच्या वातावरणात जल्लोषात साजरा झाला. तब्बल 150 वर्षांपासून अविरत सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आजही तितक्याच श्रद्धा, उत्साह आणि एकतेच्या भावनेने उजळून निघत आहे. या उत्सवाचे अध्यक्ष आसिफ गोंडेकर यांनी आपल्या मित्रमंडळासह उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन केले. या प्रसंगी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन दर्ग्यात चादर अर्पण करत धर्मसौहार्द, ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश दिला.
उत्सवाचे समन्वय आणि व्यवस्थापन आसिफ गोंडेकर आणि मित्रमंडळाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशात इक्बाल फटाकरे, सलीम गोंडेकर, हानिफ गोंडेकर, मुजफ्फर मुकादम, सलीम तांडेल, सुहास घोणे, राहुल गणपत, सुजय घरत, दिपक वैद्य, प्रथमेश कोळसेकर, सचिन पवार आदींचा मोलाचा सहभाग होता. या प्रसंगी सुरेंद्र म्हात्रे, वामन चुनेकर, अजित गुरव, राजेंद्र गुरव, राजेंद्र वाडकर, संदिप खोत, निलेश खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उरूस उत्सवाच्या निमित्ताने रेवदंड्यात धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक ऐक्याचा उज्ज्वल संदेश पुन्हा एकदा झळाळून दिसला. श्रद्धा, संस्कृती आणि सामंजस्य यांचा सुंदर मिलाफ घडवणारा हा उत्सव, रेवदंड्याच्या धार्मिक परंपरेचा आणि समाजबंधुतेचा अभिमानास्पद सोहळा ठरला.







