। मुंबई । प्रतिनिधी ।
बोरीवलीमधील साईबाबा नगरमधील चार मजली गीतांजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि.19) घडली. याबाबतची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवलीत ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले आहेत. दुपारी पाऊणच्या सुमारास अग्निशमन दलाने दुर्घटनेचा स्तर दोन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून ढिगार्याखाली कोणी अडकले आहे का? याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.