। नेरळ । प्रतिनिधी ।
देवाची भेटी हि केवळ धावपळ करून मिळणार नाही तर मानाने देवाची पूजाअर्चा आणि आपले सर्वस्व अर्पण केल्याने होत असते. शारीरिक हालचाल आणि धावपळीने देव भेटीला येणार नाही, असे ठाम प्रतिपादन दिलीप राणे यांनी केले. नेरळ मोहचीवाडी येथील अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्यात काल्याचे कीर्तन सादर करताना राणे बोलत होते.
मोहाचीवाडी येथील ओम साई साईबाबा मंदिराच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त साडेतीन दिवसाचे अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन केले होते. सहा एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत साजर्या झालेल्या सोहळ्यात काल्याचे कीर्तन कर्जत येथील भगवंताचार्य राणे यांचे सुपुत्र दिलीप राणे यांनी सादर केले. यावेळी काल्याचे कीर्तन सादर करताना राणे महाराज यांनी 32 वर्षाची सेवा बजावणार्या साईबाबा मंदिराच्या समितीच्या कार्यावर अभंग आपल्या कीर्तनासाठी घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनातून मार्गदर्शन करताना या मंडळाचे कार्यकर्ते हे गेली 32 वर्षे सेवा बजावत असून आपल्याला काही मिळेल काय? या भावनेने त्यांनी कार्य केले नाही. कारण त्यांची हि धावपळ मंडळाच्या कार्यकारीणीमधील कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत सत्कारणी लागणार, असा विश्वास केला.