गतिरोधक टाकण्याची मागणी

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील सतत वर्दळ असणार्‍या डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव या स्टाँपवरील रस्त्यावर गतीरोधक टाकण्यात आले नसल्याने वाहन चालक वेगाने वाहन चालवत आहेत. या ठिकाणी रस्ता ओलाडतांना विद्यार्थी, चाकरमानी, महिला, प्रवासी, वाहन चालक यांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार व अपघाताला आळा बसावे या उद्देशाने तातडीने डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव स्टाँपवरील रस्त्यावर गतीरोधक टाकण्यात यावे अशी मागणी माणकीवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विदयमान सदस्य विकास रसाळ यांनी केली आहे. तर लवकरात लवकर याठिकाणी संबंधित प्रशासनाने गांभीर्य घेत गतीरोधक टाकावे, जेणेकरून अपघाताला आळा बसून त्यातुन सर्वाचा प्रवास सुखकर बनेल.

माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील डोळवली, माणकीवली फाटा, अंजरुण गाव याठिकाणी गतीरोधक न टाकल्याने याठिकाणाहून वाहने भरधाव वेगाने जात असून याठिकाणी दररोज अनेक लहान मोठे अपघात घडत असल्याने स्थानिकांमध्ये प्रवास करताना भीती निर्माण होत आहे.

चंदन भारती
सरपंच,माणकीवली ग्रामपंचायत

Exit mobile version