| रसायनी | वार्ताहर |
आगरी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय आढावा बैठक कल्याण पश्चिमेतील वायले नगरमधील साई हॉल मध्ये पार पडली. यावेळी होणार्या वर्धापन दिनाच्या रूपरेषा ठरवण्यात आली. या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात रक्तदान, अन्नदान, वृक्ष लागवड, विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय उपयोगी वास्तूचे वाटप, गाव, शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण इत्यादी निरनिराळे सामाजिक कार्यक्रम आखण्यात येणार असून मनिषा नगर ते गडकरी रंगायतन इथपर्यंत रोड रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीस आगरी सेना नेते प्रदिप साळवी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलास पाटील, संपर्कप्रमुख मनोज साळवी, नाशिक जिल्हा प्रमुख संपत डावखर, ठाणे जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठाणकर, सरचिटणीस मंगेश शेलार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रभुनाथ भोईर, ठाणे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष नारायण अंदाडे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय फुलोरे, युवा आगरी सेना उपाध्यक्ष गणेश कडु व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सर्व तालुका प्रमुख, सर्व शहर प्रमुख व महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते व सदर आढावा बैठकी नंतर ठाणे जिल्ह्यातील तालुका, शहर, विभागीय स्तरावर नविन पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या.
या आढावा बैठकीत आगरी समाज व बहुजन समाजाचे अनेक नागरिक उपस्थित होते, जे संघटनेसाठी अनेक वर्षांपासून चांगले काम करीत आहेत. त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना बढती देण्यात आली. यावेळी आगरी नेत्यांनी प्रबोधात्मक भाषणे करून नवीन समाज जागृती केली आणि विखुरलेल्या समाजानी एकत्र यावे म्हणून हाक दिली. यावेळी अनेक जिल्ह्यातून आगरी समाज बांधव उपस्थित होते.