| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईजवळील समुद्रात नीलकमल बोटीचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना मढजवळ पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या मढजवळ समुद्रात दोन मासेमारी करणाऱ्या बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
मुंबईच्या मढ समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजाचा शनिवारी (दि.28) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे मासेमारी करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटीतील सहा खलाशांनी संपूर्ण रात्रभर जागून बोट समुद्रात बोलण्यापासून वाचवली, यानंतर कोस्ट गार्ड च्या साह्याने तिसाई या मासेमारी करणाऱ्या बोटीला मढ बंदरावर आणण्यात आले आहे. मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे चालक हे नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मासेमारी करणाऱ्या बोटीच्या मालकाने केला आहे.