। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
तब्बल दीड वर्षांनंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. युद्धविराम करारानंतर गोळीबार थांबवण्यात आला होता. मात्र, आज पाक रेंजर्सनी अरनिया सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर गोळीबार केला. बीएसएफ जवानांनीही गोळीबार करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुदैवाने या हल्ल्यात बीएसएफच्या कोणत्याही जवानाला कोणतीही दुखापत झालेली नाही.