तलावात बुडून बालकांचा मृत्यू

निडीमधील दुर्घटना

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील निडी गावातील दोन 6 वर्ष कोवळ्या मुलांचा गावातील तलावात बुडून मृत्यू झाला. यातील मयत मुलगा आरुष हितेश भोय (6) रा.झोतिरपाडा-पेण  येथील आहे. तो आपल्या मामाच्या गावी पालखी सोहळ्यासाठी आला होता. तर, दुसरा  मुलगा निरव रोहन वाघमारे (6) मुळगाव रा.निडी -रोहा (सध्या वास्तव घाटकोपर-मुंबई) हा सुद्धा मुलगा आपल्या गावी पालखी सोहळ्याकरिता आला होता. दोन्ही मुले दुपारच्या वेळेस गावाच्या बाजूला असलेल्या तलावात रविवारी (दि.23) पोहायला गेली असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुपारची वेळ होती त्यावेळेस तलाव शेजारी कोणी नसल्याने त्या दोन मुलांना कोणी वाचू शकले नाहीत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version