नागरिकांनी केली उल्हासनदीची स्वच्छता

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून वाहणारी उल्हास नदीत कचरा साठल्याने दहिवली गाव परिसर विचार मंचाच्या माध्यमातून नदी स्वच्छता अभियान करून उल्हास नदीची स्वच्छता करण्यात आली.

दहीवलीतील अनेकांनी सहभाग घेऊन उल्हास नदी स्वच्छ केली. गिरीश सुर्वे, शाम देशमुख, बाळा रामाणे, महेंद्र महाडिक यांनी नदीमध्ये उतरुन कचरा गोळा केला. या मोहिमेसाठी नगरपालिका कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. हातमौजे, मुखपट्टी, घमेली, पंजा व जेसीबीच्या सहाय्याने नदी स्वच्छ करण्यात आली. या अभियानात विकास चित्ते, सुनील जाधव, अतुल पवार, दिनेश कडू, मल्हारी माने, मधूकर सुर्वे,नगरसेवक संकेत भासे, विजय जिनगरे, कुणाल बर्वे, महेंद्र कर्वे , सचिन खैरे, मिलिंद चिखलकर, भरत बामणे, राहुल गायकवाड, महेंद्र तेरेदेसाई, पप्पू वडदकर, आप्पा कारूळकर, भाऊ खानविलकर, संजय देशमुख, कुमार निमकर, प्रकाश जाधव, गणेश कनोजे, जयेश घरत, दीपक बामणे, प्रकाश थोरवे, तिर्थेश शिंदे, शशीकांत कांबळे, संजय चंदने, विशाल दांडेकर, रमाकांत जाधव, शुभांगी कडू, पूनम शिर्के, अपर्णा चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version