थंड शीतपेयांकडे अनेकांचा कल
| पाताळगंगा | वार्ताहर |
वाढत्या उष्णतेने रौद्ररूप धारण केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शरीराला गारवा मिळण्यासाठी चैत्राच्या आगमनाने वृक्षांना आलेल्या हिरव्यागार पानांच्या छायेखाली सावलीचा आधार घेतला जात आहे. तर, रणरणत्या उन्हामध्ये थंड पेय आणि फळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या वाढत्या उष्म्यामुळे थंडावा मिळविण्यासाठी फ्रीजमधील व माठामधील थंड पाणी व विविध शीतपेये तसेच कलिंगड, काकडी, कोकम इत्यादी फळे खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. थंड पेये पिण्यासाठी तसेच पाण्याचे माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कलिंगड, काकडी तसेच थंड पेये विक्री करणार्यांनी ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले असल्याचे दिसत आहेत.