शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील यांचा आरोप
| उरण | वार्ताहर |
भेंडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या सेंट्रल वेअर हाऊस कंपनीच्या डिस्ट्रीपार्क, लॉजिस्टिक्स पार्कवर भिक नको हक्क हवा म्हणत भेंडखळ ग्रामविकास आघाडीतर्फे सुरु करण्यात आलेले जनआंदोलन स्थगित करण्यात आले आहे.यासाठी पोलीस प्रशासनाने यशस्वी मध्यस्थी केली आहे.यावेळी ग्रामविकास आघाडी भेंडखळचे समन्वयक अतुल पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांवर होणार्या अन्यायाला उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे सर्वस्वी जबाबदार असून,त्यांच्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्थांवर बेरोजगारीची कुर्हाड आली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.
भेंडखळ गावातील शेतकर्यांनी आपल्या पीकत्या जमिनी सिडकोला दिल्या. त्या वेळी प्रकल्पग्रस्तांना त्या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकर्यांचे लेखी आश्वासन सिडकोने दिले होते. गेल्या दोन वर्षापासून येथे कोनेक्स कंपनीचे काम सुरू आहे. गावातील आज जवळपास 400 ते 500 सुशिक्षित बेरोजगार असताना संतोष शेट्टी हा ठेकेदार बाहेरील लोकांना नोकर्या देत आहे. भेंडखळ गावातील ट्रान्सपोर्ट व इतर कामे करणार्यांना अतिशय कमी दराने कामे करण्यास सांगत आहे. तसेच स्वतः व स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे कंपन्या बनवून कंपनीतील सर्व कामे दादागिरी करून करत आहे.असा आरोपही पाटील यांनी केला.
या सर्व गोष्टींचा भेंडखळ ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून ठेकेदाराच्या विरोधात व त्याच्या दादागिरीस ठामपणे उत्तर देण्यासाठी दादागिरी करणार्या संतोष शेट्टी विरोधात ग्रामविकास आघाडी तर्फे गुरुवारी ( 9 फेब्रुवारी) कोनेक्स गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजीत केले होते. पोलीस प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीमुूळे काही दिवसापूरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले. केले आहे. यावेळी उपसरपंच संगिता भगत,दीपक ठाकूर, सोनाली ठाकूर, स्वाती पाटील, स्वाती घरत, अक्षता ठाकूर ,शीतल ठाकूर , अभिजित ठाकूर , अजित ठाकूर ,मच्छिंद्रनाथ घरत, योगेश ठाकूर , मनोहर म्हात्रे, वैभव भगत, सुरेश ठाकूर , मेघनाथ भगत, चेतन ठाकूर , किरण परत, अशोक ठाकूर , किशोर ठाकूर , मिलिंद ठाकूर , किसन भगत, काशिनाथ पाटील, नीलेश्वर ठाकूर, सूर्यकांत ठाकूर ,पंढरीनाथ घरत ,लक्ष्मण ठाकूर ,विजय ठाकूर ,विकास ठाकूर ,गणेश घरत ,लंकेशठाकूर , ययाती ठाकूर आदींसह नागरिक उपस्थित होते
प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरुपी नोकरी असा सिडकोचा अद्यादेश असताना प्रकल्पग्रस्तांना नोकरीत का सामावून घेतले जाते नाही. मग असा अन्याय जेथे होतो तेथे संघर्षाची निर्मिती होते. कामगारांनी भूमिका घ्या आणी आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या सोबत येऊ. – अतुल भगत, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष (शिंदे)