अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
ज्येष्ठ नेते,राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार हे राजकारणातले चाणक्य व परिपक्व नेतृत्व आहेत. व ते मुळचे काँग्रेसचे आहेत. त्यांचा हात धरुन काँग्रेसने पक्ष वाढवायला पाहीजे असे प्रतिपादन माजी आमदार डी.एन. चौलकर यांनी केले. ते बुधवार (दि. 15) अलिबाग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी निम्मित लिहिलेल्या झंझावात या पुस्तकाची माहिती दिली.
डी.एन. चौलकर यांनी 31 वर्षा नंतर राजकारणात परत येण्याचे ठरविले आणि त्याचे कारण देशाची सध्या राजकीय परिस्थिती असे त्यांनी सांगितले. सध्या देशामध्ये राजकीय दृष्ट्या परिस्थिती बरोबर नाही. राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर काँग्रेस हा नगण्य पक्ष झाला आहे विशेषतः तालुका आणि जिल्ह्यामध्ये. इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्यासारखे वलय असलेले नेतृत्व राहिलेले नाही. पण काँग्रेस हा जुना पक्ष असल्यामुळे त्याची मुळ अजूनही टिकून आहेत,आहेत. काँग्रेस अंतर्गत ऐक्य नाही असे त्यांनी मत मांडले.
युवक काँग्रेसला कोणी वाली राहिलेल नाही व नेत्तृत्वाचा अभाव आहे. काँग्रेस हा मजबूत पक्ष म्हणून उभा करण्यासाठी जेष्ठ काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे मी त्यासाठी तयार आहे. डी.एन.चौलकर,माजी आमदार
यावेळी त्यांनी केंद्र सरकावर टीकाही केली.मोदी सरकारकडून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक दिली जाते व लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण केला जातोय. रायगड जिल्ह्यातील राजकारणावर भाष्य करतांना त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांची अभ्यासू लोकनेता या शब्दात प्रशंसा केली व तटकरेंनी सर्व पक्षांसाठी मोठ आव्हान उभे केल आहे असे म्हणाल ते खर्या अर्थाने जनतेची काम करत आहेत.
डी.एन. चौलकर हे 1985 साली ईशान्य मुंबई (मालाड ) मतदार संघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. 1980 साली त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. ते भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधीचे निकटवर्तीये. त्यांनी अनेक समाज कार्य केले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचा मुरुड येथे हॉस्पीटल उभारण्याचा मानस आहे.