अचानक आलेल्या संकटात बहुतांश ठिकाणी तयार झालेले पीक आडवे पडले
अलिबाग । विषेश प्रतिनिधी ।
शुक्रवारी कोसळलेल्या अवेळी पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसानच मिळाले नसताना आता पुन्हा या संकटाने शेतकरी कोलमडून गेला आहे.
सतर्कतेचा इशारा
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात अजून दाट होण्याची शक्यता,पण चांगली बाब, ते किनारपट्टी पासून दुर जात आहे.पण त्याचा प्रभाव पुढचे 2 दिवस रायगड सह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणी संलग्न भागावर असेल असा अंदाज हवामान खातयाने वर्तवला आहे. त्यामुळे शनिवारपासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील जनतेला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अचानक आलेल्या संकटात बहुतांश ठिकाणी तयार झालेले पीक आडवे पडले आहे.
घास हिरावून घेतला
शुक्रवारी कोसळलेल्या अवेळी पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसानच मिळाले नसताना आता पुन्हा या संकटाने शेतकरी कोलमडून गेला आहे.
रायगडात अवकाळीचा फटका
