| दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे चैत्रशु चतुर्दशी व पौर्णिमेला श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ यात्रा मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस भरलेल्या यात्रेला राज्यभरातील भाविकांची अलोट गर्दी लोटली होती.
पुणे व अनेक शहरानजीकचे पर्यटन स्थळ म्हणून दिवेआगरला खास पसंती दिली जाते. विशेषतः यावेळी शालेय परीक्षा झाल्याने अनेक कुटुंब दर्शनासाठी आल्याने यात्रेला गर्दी दिसून आली. कारण श्रद्धेने होणारी येथील गळी फिरणे व हाथकोडे यात्रेतील वैशिष्ट्ये ठरत आहेत. या उत्सवात दोन दिवस दिवेआगर गावामधील घरोघरी श्री भैरवनाथाची परडी फिरते. सालाबादप्रमाणे गावातील मंडळीकडून मानपान दिला जातो. गावातील प्रमुख उत्सव असल्याने दर्शनासाठी गर्दी उसळते.
आपली मनोकामना पूर्ण होण्यास यावेळी सुद्धा अनेक भक्तांकडून देवाला साकडे घालण्यात आले. येथील ‘हाथकोडे’च्या परंपरेनुसार मंदिराच्या आवारात खेळले गेले. यानंतर पुढे या यात्रेच आकर्षण ठरते ते गळी फिरणे. आतुरतेने वाट पाहतात त्या क्षणाची. मग त्यावेळेला मंदिरासमोरील पटांगणात चौथरा आहे. तिथे पुजार्याला गळ टुपवण्यात येते. नंतर साठीवर लाट फिरवण्यासाठी नेले जाते, ही लाट जमिनीपासून 30 फुटावर असते. या उंचीवर समांतर बांधून एका बाजूला पुजार्याला गळाच्या दोरीने बांधून पाच फेर्या फिरवले जाते. हे सर्व याची देही याचि डोळा पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी दिसून आली.