। पाताळगंगा । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील असलेल्या नांवढे गावातील विज पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे येथिल ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या ठिकाणी लोकसंख्या 180 च्या आसपास असल्यामुळे विजेचा वापर वाढले आहे. त्याच बरोबर पेयजल योजना असल्यामुळे प्रत्येकांपर्यंत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नविन विद्युत जनित्र बसविण्याची मागणी करण्यात आली .यासाठी येथिल ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अभियंता खालापूर यांच्याकडे या ठिकाणी नविन विद्युत जनित्र बसविण्याचे निवेदन किरण हडप, अक्षय पिंगळे यांनी दिल्यांचे समजते.
या ठिकाणी नविन विद्युत जनित्र बसविण्यात आल्यांने विजेचा पुरवठा सातत्याने सुरळीत राहु शकते. त्याच बरोबर घरामध्ये लहान मुळे, वयोवृद्ध नागरिक असल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर सातत्याने विज पुरवठा कमी अथवा जास्त दाबाने होत असल्यामुळे घरातील उपकरण खराब होण्याची संभावना मोठ्याप्रमाणावर असल्यामुळे तातडीने या ठिकाणी नविन विद्युत जनित्र बसविण्यांची मागणी करण्यात आली आहे.