खा. सुनील तटकरे यांचा गंभीर आरोप
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्याच्या प्रगती व विकासात्मक दृष्टिने अत्यंत महत्त्वाचे होते. शिंदे-फडणवीस सरकारने रायगड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम निविदेला, तसेच पर्यटनाच्या कामाला स्थगिती दिली, असा गंभीर आरोप खा. सुनील तटकरे यांनी केला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारने विकासकामांना चालना द्यावी, असे आवाहनही खा. तटकरे यांनी केले.
अवकाळी पावसाने कोकणातील पीक धोक्यात आले आहे. राज्य सरकारने कोकणातील शेतकर्यांच्या वेदना जानून घ्याव्यात. आ. अनिकेत तटकरे, आ. आदिती तटकरे कोकणातील नैसर्गिक आपत्तीवर प्रश्न उपस्थित करणार आहेत. एनडीआरएफ निकषाच्या बाजूला जात महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्तीत तिप्पट मदत केली, त्यानुसार आता आलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तशीच भरीव मदत करावी व शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. तटकरे यांनी केली.