| तळा | वार्ताहर |
तरूण एकत्र येतात तेव्हा भविष्यात स्वप्न साकार होण्यास वेळ लागत असे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यानी केले. रहाटाड कोळीवाडा येथील स्वराज्य क्रीडा युवक मंडळाने राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.याप्रसंगी ते बोलत होते. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर काम करू शकलो.राजकारणात बदल हे घडत असतात आपण प्रामाणिक राहून कामे करणे हे ध्येय आमचे आहे.तुम्ही सर्व पाठिशी कायम असल्यामुळे आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही,असे आश्वासन तटकरे यांनी दिले. यावेळी 150 ते 200 युवकांचा प्रवेश झाला.व्यासपीठावर माजी जि.प. सदस्य बबन चाचले, तालुकाध्यक्ष नाना भौड, माजी सभापती अक्षरा कदम, तळा उपनगराध्यक्ष चंद्रकात रोड, तालुका महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे ,उत्तम जाधव, चंद्रकात राऊत, ईस्माईल पल्लवकर , गणेश वाघमारे, सचिन कदम पं.स. सदस्या देवकी लासे उपस्थित होते.