आदर्श पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

। अलिबाग । प्रतिनिधी ।
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची 2022 ते 2027 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. निवडणूक बिनविरोध झाली. संचालक मंडळाच्या 15 संचालक पदासांठी प्रत्येकी एकच उमदेवारी अर्ज दाखल झाला होता. सर्व अर्ज छाननीत वैध ठरले होते. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2104 च्या कलम 30 अन्वये हे सर्व संचालक बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माधव भाटकर यांनी जाहीर केले.

सुरेश गणपत पाटील, श्रीकांत जुगराज ओसवाल, विलाप मारूती सरतांडेल, अभिजीत सुरेश पाटील, महेश विष्णू चव्हाण, अनंत शामराव म्हात्रे, सतिश दत्तात्रेय प्रधान, सुरेश हरिभाऊ गावंड, कैलास जयवंत जगे, रामभाऊ मारुती गोरीवले, आत्माराम मंगा काटकर, रेश्मा सुशिल पाटील, वर्षा विक्रम शेठ, भगवान नारायण वेटकोळी, जगदिश हरिश्‍चंद्र पाटील हे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.

Exit mobile version