जेएनपीए बंदरात सडतोय चार हजार टन कांदा

| उरण | वार्ताहर |
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदराबाहेरील विविध कंटेनर यार्डमध्ये सुमारे 200 कंटेनर कस्टम विभागाने थांबविले आहेत. कांदा नाशवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे 20 कोटींचे आर्थिक नुकसान होणार आहे.अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे 60- 70 कंटेनर निर्यातीसाठी तयार होते. मात्र कस्टम विभागाने कांद्याचे कंटेनर रोखून ठेवले. कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर निर्यातीच्या प्रतिक्षेत उभे आहेत. जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदरात आणि विविध कंटेनर यार्डमध्ये महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून निर्यातीसाठी आलेले सुमारे 200 कंटेनर आहे त्या स्थितीत उभे आहेत.

Exit mobile version