| खोपोली | प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या हस्ते अमृत परियोजने अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले. याचदरम्यान खोपोली सेक्टर अंतर्गत खालापूर तालुक्यातील घोडिवली येथील तलाव व विहीर, परिसर स्वच्छ करण्यात आले. यावेळी उषा पिंगळे, अर्चना पिंगळे, प्रकाश पिंगळे, सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते खालापूर, कर्जत, सुधागड, येथील साधसंगत आणि सेवादलचे बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.