खालापूरातून संजोग वाघेरेंना मताधिक्य देऊः शिवानी जंगम


| खोपोली | प्रतिनिधी |

श्रीरंग बारणे खासदार असताना दहा वर्षात एकही विकासकाम केलं नाही. तसेच मी नगराध्यक्षा असताना निमंत्रण देऊन एकदाही कार्यक्रमाला आले नसल्याचा आरोप खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तसेच विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम यांनी केले आहे. आता आम्हाला जमीनीवरचा, आमच्या बरोबरचा खासदार पाहिजे असे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी खालापूर शहरातून मोठा लीड देवू असा विश्‍वास व्यक्त केला आहे. यावेळी जंगम म्हणाल्या की महायुतीने 400 पार केले तर संविधान बदलू शकता आणि ही निवडणूक शेवटीची असेल. त्यामुळे इंडिया आघाडीतील पदाधिर्‍यांनी मेहनत घेवून आपल्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे. खालापूरात तर शिवसेना ठाकरे गटाचे नवीनदादा घाटवळ, उमेश गावंड आणि शेकापक्ष एकत्र आल्याने संजोग वाघेरेंना मोठी मताची आघाडी देवू असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील अष्टविनायकापैकी महडच्या वरदविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी खालापूर शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वाघेरे यांचे जोरदार स्वागत केले. शिवसेना ठाकरे गटाचे सल्लागार नवीन घाटवळ, एस.एम .पाटील,खालापुर तालुका प्रमुख पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, शेकाप नेते खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शेकाप नेते संतोष जंगम, माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, संभाजी पाटील, नितीन पाटील, सुविधा, विचारे मंदा भोसले, तेजस पाटील आदी प्रमुखांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version