ग्रामपंचायत पोटनिवडणूक: दिड वाजेपर्यंत 48.62 टक्के मतदान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचसह सदस्यपदाच्या 35 जागांसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 48. 62 टक्के मतदान झाले. दुपार असतानाही मतदान करण्याचा उत्साह कायमच असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे. जिल्ह्यातील वैजाळीमध्ये 41.91 टक्के, नागावमध्ये 48.54 टक्के, खंडाळेमध्ये 43.72 टक्के, एकदरामध्ये 48.95 टक्के, काशीदमध्ये73.87 टक्के, मांडलामध्ये 44.37 टक्के, पाली तर्फे कोतल खलाटीमध्ये 62.47 टक्के, होराळेमध्ये 69.54 टक्के, वणीमलई कोंडमध्ये 41.36 टक्के, पूईमध्ये 42.98 टक्के, मोहोप्रेमध्ये 63.95 ताम्हाणेमध्ये 65.10 टक्के, वराठीमध्ये 36.13 टक्के, महालगूरमध्ये 63.99 टक्के, तुर्भे बुद्रूकमध्ये 53.21 टक्के, घोणसेमध्ये 40.90 टक्के, दिवेआगरमध्ये 39.3 टक्के आणि बागमांडलामध्ये 47.14 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वात जास्त मतदान काशीद, होराळे, मोहोप्रे येथे झाले असून सर्वात कमी मतदान दिवेआगर, वणीमलाई कोंड, घोणसेमध्ये झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version