| खोपोली | प्रतिनिधी |
खरीवली ग्रामपंचायतील तब्बल चार ते पाच दशकांनंतर संपूर्ण वॉर्ड क्र.2 बिनविरोध झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने घेतली सामंजस्याची भूमिका घेत, आपापसातील वाद सामंजस्याने मिटविल्याने हे यश मिळाले आहे. सर्वपक्षीयांनी मिळून आम्ही खरीवलीकर ग्रामविकास आघाडी निर्माण केली आहे. यासाठी सचिन दाभोलकर यांनी मेहनत घेतली.
या आघाडीत शांताराम पाटील, अशोक पाटील, मिलींद दाभोळकर, राजेंद्र पाटील, नरेश पाटील, किरण पाटील, संजय हेलंडे, सचिन परबळकर, भागूराम भोईर, मोतीराम पाटील, चंद्रकांत पाटील, मिनेश पाटील, सूरज घाटवळ, निखील पाटील, आप्पा ढगे, निलेश दिघे, राकेश गायकर, निर्मला पाटील, शंकुतला हेलंडे, सचिन दाभोलकर, प्रमोद हेलंडे, विष्णू पाटील, पुंडलिक पाटील, राजेंद्र महाडीक, बाळकृष्ण तळकर, प्रकाश जंगम, जगदीश पाटील, विजय तळकर, विश्वास पाटील यांनी पुढाकार घेऊन आघाडीला साथ दिली.