रांगोळीतून शिवरायांना अभिवादन

। पाताळगंगा । वार्ताहर ।
महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरातील हजारो भक्त येतात. त्याचबरोबर सोमवरी संकष्टी चतुर्थी निमित्ताने मॉ साहेब जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मनमोहक रांगोळी काढण्यात आली होती.

ही सुंदर रांगोळी रोशन पाटील, रोहित भोईर, रवी चौधरी, योगेश्री ढमाले, स्वप्नील गायकर, शुभम कुमरे, कामिनी पाटील, ज्योती पाटील, हार्दिक घाग, पद्मिनी खाडे, नम्रता गोंधळी आदी कलाकारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. ही रांगोळी काढण्यासाठी 30 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. तसेच या रांगोळीसाठी 20 तासांचा कालावधी लागला.

Exit mobile version