| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विहूर येथे विहूर ग्रामस्थ मंडळ (मुंबई) यांच्यातर्फे मुंबई कमिटी अध्यक्ष अशोक बामुगडे व उपाध्यक्ष गजानन कदम मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली चेतन सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील राधाकृष्ण मंदिरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दीप प्रज्ज्वलन करून, पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी गावअध्यक्ष महेंद्र कदम, उपाध्यक्ष दामोदर बांद्रे, वंदना दळवी, सुजीत महाडिक, संतोष पोटले, हरेश नाईक, अशोक बामुगडे, उत्कर्ष महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे चेतन सानप यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केले.
यावेळी स्वेता नाईक (आयटी डिग्री), अचल बामुगडे (डेटा सायन्स डिग्री), उत्कर्ष महाडिक (कृषी डिग्री), सुजल बांद्रे (मॅकेनिकल डिप्लोमा), दिव्या बांद्रे (15 वी.फस्ट क्लास), कौशिक पाटील (12वी 60टक्के), मानशी दळवी (10वी 90 टक्के) यांचा मुंबई कमिटीच्या वतीने गौरविण्यात येऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश राम बांद्रे यांनी तर आभार गजानन कदम यांनी मानले. किशोर मधूकर पाटील, विदेश यशवंत दळवी,उमेश हरिश्चंद्र कदम, निलेश लक्ष्मण बांद्रे, निलेश नारायण जाबडे, शशिकांत श्रीकांत बांद्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.